महाराष्ट्र राज्याच्या ६१ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘लोकसत्ता’च्या वतीने आयोजित ‘गाथा महाराष्ट्राची’ या वेब व्याख्यानमालेत ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरे सहभागी झाल्या होत्या. ‘मराठी कवितेची परंपरा’ या विषयावर त्यांनी शेवटचे पुष्प गुंफले. त्यात त्यांनी दीड-दोन हजार वर्षांपूर्वी लोकवाङ्मयाच्या मुळाशी रुजलेल्या कवितेच्या इवल्याशा बीजापासून आज एकविसाव्या शतकात फुलारलेल्या कवितेच्या वटवृक्षापर्यंतचा प्रवास ओझरत्या वाणीने विशद केला.
#LoksattaMaharashtraGaatha #महाराष्ट्र_गाथा #ArunaDhere