डोंबिवली - एकाबाजूला कल्याण डोंबिवली शहरात स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवली जात असताना दुसरीकडे या सांस्कृतिक नगरीत सुसज्ज अशी स्मशानभूमी नसल्याने रस्त्यालगतच उघड्यावर मृतदेहांवर अंत्यविधी करण्याची दुर्दैवी वेळ नागरिकांवर आली आहे. नवीन स्मशानभूमी बनविण्याबाबत केवळ कागदी घोडे नाचविले जात असून स्थानिक नगरसेवकही यात कमी पडत असल्याची चर्चा डोंबिवलीकरांमध्ये रंगली आहे.