Random Video

20 एकर ऊस जळून खाक; शेतकऱ्यांनी दिला आत्मदहनाचा इशारा

2022-03-19 1 Dailymotion

जालना जिल्ह्यात 20 एकर ऊसाला लागल्याने ऊस जळून खाक झाला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी अंबड तालुक्यातील गंगा चिंचोली शिवारात घडली आहे. या आगीमुळे शेतकऱ्यांचे जवळपास एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीत सात शेतकऱ्यांच्या ऊसाच्या पिकाचे नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या या ऊसाला कुणी अज्ञात व्यक्तीने आग लावली. आग लागल्याची माहिती मिळताच शेतकऱ्यांनी शेतात धाव घेतली. परंतु आगीने बघता बघता रौद्र अवतार घेतला आणि संपूर्ण जळून खाक झाले. या शेतकऱ्यांनी पोलीसांना अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पण पोलीसांकडून कोणताही प्रतिसाद न आल्याने आत्मदहनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय.