अग्निपथ योजनेवरून देशभरात अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडत आहे. "या तरुणांना योजना चुकीच्या पद्धतीने सांगितली गेली आहे, त्यामुळे हा असंतोषाचा उद्रेक झाला आहे" अशी प्रतिक्रिया जनरल राजेंद्र निंबोरकर यांनी पुण्यातील भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.